शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कामटेसह पाचजणांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:15 IST

सांगली : पोलीस कोठडीतील संशयित अनिकेत कोथळे याच्या मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासहपाचजणांना गुरुवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या पाचहीजणांना १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान, सहावा संशयित अनिल लाड याला तपासकामासाठी पोलिसांनी ताब्यात ठेवल्याने, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले नाही. संशयितांना न्यायालयात आणले जाणार असल्याचे ...

सांगली : पोलीस कोठडीतील संशयित अनिकेत कोथळे याच्या मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासहपाचजणांना गुरुवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या पाचहीजणांना १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान, सहावा संशयित अनिल लाड याला तपासकामासाठी पोलिसांनी ताब्यात ठेवल्याने, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले नाही. संशयितांना न्यायालयात आणले जाणार असल्याचे वृत्त पसरल्याने न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.सांगली आकाशवाणीजवळ एका अभियंत्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून दोन हजार रुपये आणि मोबाईल पळविल्याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित म्हणून अनिकेत अशोक कोथळे (वय २६) आणि अमोल सुनील भंडारे (२३, दोघे रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) यांना दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. दोघांना सोमवारी रात्री चौकशीसाठी बाहेर काढल्यावर. दोघेही पळाले, असा बनाव पोलिसांनी रचला. अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांनी घातपाताची शंका व्यक्त केल्याने हे प्रकरण तापले. अनिकेतला पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघड झाले. त्याचा मृतदेह पोलिसांनी आंबोली घाटात जाळला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सहा जणांना अटक केली होती.दरम्यान, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास कामटे याच्यासह अरुण टोणे, मुल्ला, शिंगटे व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या पाच जणांना कडेकोट बंदोबस्तात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांच्या न्यायालयात हजर केले. संशयितांना न्यायालयात आणले जाणार असल्याचे समजताच या परिसरात गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी फौजफाटा तैनात केला होता. पाच ते सहा वाहने एकमेकांमागे लावून संशयित कामटे व चार जणांना काळे बुरखे घालून न्यायालयात आणले.सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता उज्ज्वला आवटे यांनी बाजू मांडली. पोलिस ठाण्यात झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. कोथळेच्या मृत्यूप्रकरणी संशयितांची भूमिका निश्चित करावयाची आहे. संशयितांनी मारहाण करताना कशाचा वापर केला, त्याचा मृतदेह कोणत्या वाहनातून नेला, आंबोलीपर्यंत जाण्यासाठी त्यांना कोणी मदत केली, याचा तपास करण्यासाठी १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने या पाच संशयितांना १३ दिवसांची कोठडी सुनावली. पोलिसांनी या पाचही संशयितांना न्यायालयातून हलविले. सहावा संशयित अनिल लाड याला पोलिसांनी तपासकामी ताब्यातच ठेवल्याने न्यायालयात हजर केले नाही.गुन्हा व अटकेबाबत साशंकताअनिकेत व अमोल या दोघांना लूटमारप्रकरणी अटक करण्यात आली. या प्रकरणात संतोष गायकवाड (रा. कवलापूर) याने फिर्याद दिली होती. गायकवाड मुंबईत राहतो. तो मूळचा कवलापूरचा आहे.त्यामुळे पोलिसात दाखल केलेला लूटमारीचा गुन्हाच बनावट असल्याचा दावा कोथळे कुटुंबियांनी केला असून, फिर्यादी गायकवाड याचीही चौकशीची मागणी केली आहे. अटकेतील दोघांपैकी केवळ अनिकेतलाच पोलिसांनी मारहाण केली आहे.तसेच तो ज्या बॅग्ज हाऊसमध्ये काम करीत होता, तेथील दुकानदाराबाबतही नातेवाईकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणात दुकानदाराच्या चौकशीची मागणी होत आहे.सीआयडीताबा घेणारकोथळे मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. सीआयडीचे अप्पर अधीक्षक नरेंद्र गायकवाड, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांचे पथक कालपासून सांगलीत तळ ठोकून आहे. अद्याप सीआयडीने सहाही संशयितांचा ताबा घेतलेला नाही. तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर रात्री उशिरा सर्वांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले. सीआयडीचे पथक न्यायालयाच्या आवारातही उपस्थित होते.केवळ दोन हजारासाठी...कवलापूर येथील संतोष गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीवरून अनिकेत व अमोल या दोघांना पोलिसांनी पकडले होते. संतोष याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील दोन हजाराची रोकड व मोबाईल काढून घेतल्याची तक्रार त्याने केली होती. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी मात्र ही तक्रारच खोटी असल्याचा दावा केला आहे. केवळ दोन हजाराच्या लुटीच्या प्रकरणातील तथ्य सीआयडीकडून समोर आणले जाईल; पण या प्रकरणात अनिकेतला मात्र आपला जीव गमावावा लागला.

टॅग्स :Crimeगुन्हा